महिला सुरक्षेसाठी तसेच हक्कांसाठी संवैधानिक आणि कायदेशीर तरतूद

ॲड सोनिया अमृत गजभिये भारत हा एक समृद्ध संस्कृती आणि परंपरांसाठी ओळखला जाणारा देश आहे. भारतीय समाजात स्त्रीयांवर होणाºया अन्यायाच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. सामाजिक विषमता ही जात, धर्म आणि लिंग या तीन घटकांवर आधारित आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे. स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू […]

माझं माणूस असणं हे ब्राह्मणी व्यवस्थेनं घालून दिलेल्या व्याख्येच्या पलीकडं आहे…

गुणवंत सरपाते ‘अप्रोप्रीएशन’ ह्या शब्दाचा अर्थही ठाऊक नव्हता तेंव्हा. शोषक वर्गानं त्यांच्या कम्फर्टनुसार आखून दिलेल्या प्रत्येक बायनरी नरेटीव्हच्याचं बाजारगप्पात अडकून पुरोगामी गालगुच्चे घेत जगणं साला, तेंव्हाही जमलं नव्हतं. सारी धडपड होती आजूबाजूचं अक्राळविक्राळ जात वास्तव आन ब्राह्मण-सवर्णांचं अमानवी वर्चस्व कसं काम करत हे समजून घेण्याची. माझं संबंध मानवी अस्तिव फक्त […]

तर आम्ही जातीचे नाव घेऊन का न बोलावं?

सागर अ. कांबळे तुम्हाला ताकद आणि सत्ता जर जातीमुळे मिळत असेल तर आम्ही जातीचे नाव घेऊन का न बोलावं? ब्राह्मण असल्यामुळे मिळणारी अकॅडमिक मधली सत्ता तुम्हाला सांस्कृतिक वर्चस्व मिळवून देते. तुम्हाला पाहिजे तशी भेसळ ज्ञानाच्या माहितीच्या साहित्याच्या नावाखाली करून देते. निओलिबरल भांडवलशाहीला जात नाही का ब्राह्मण बनिया आगरवाल गुप्ता पारशी […]

मूकनायक चे ऐतिहासिक महत्त्व आणि बाबासाहेबांची भूमिका

पवनकुमार शिंदे मूकनायक ह्या पाक्षिकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात केली होती ती ३१ जानेवारी १९२० रोजी. त्यास आज १०१ वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने ह्या ऐतिहासिक घटनेचा घेतलेला आढावा. बाबासाहेबांनी सदर वृत्तपत्राची ध्येयनिष्ठा संत तुकोबारायांच्या अभंगरुपी बिरुदावलीतुन केली होती, ” काय करूं आतां धरुनियां भीड । निःशंक हें […]

व्यक्तीचे स्थान नाकारणारा धर्म मला मान्य नाही

January 31, 2021 Editorial Team 0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुमच्यावर हा अत्याचार का? मी वर वर्णन केलेले जे काही बरोबर असेल तर तुम्हाला पुढील निष्कर्षाशी सहमत व्हावे लागेल. निष्कर्ष असा आहे की: तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहिल्यास हिंदूंच्या जुलूमांना तुम्ही कधीही तोंड देऊ शकणार नाही. तुमच्यात प्रतिकाराचे सामर्थ्य म्हणून तुमचा छळ होतो, यात मला काही शंका […]

घटनेच्या पहिल्या पानावर गाजतंय माझ्या भिमाचं नाव!!!

प्रतिक्षा भवरे वाटले भीमाला लोकं शिकतील सवरतील, स्वतःसवे समाजाचा विकासही करतील… 26 जानेवारी 1950 ला संविधानाची अमलबजावणी झाली आणि भारत प्रजासत्ताक बनला. पण प्रजासत्ताक दिन कोणामुळे..? तर डॉ. बी. आर. आंबेडकरांमुळे..! संविधान कोणामुळे….? तर आपल्या बापामुळेच… तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ ठेवलय रं, पुसणार नाही असच अक्षर भिमानं लिहिलय रं..! लोकांनी, […]

गांधी व गोडसे यांच्या binary politics मध्ये आंबेडकरवाद्यांनी पडू नये

राहुल पगारे गांधी आणि फुले !भाजपचा बाप, जन संघ व जन संघाचा बाप, हिंदु महासभा जेव्हा राजकारण समजण्याच्या पलीकडे होते, त्यांना तेव्हा मिसरुड पण फुटले नसेल अगदी त्या १९२० च्या काळात काँग्रेस गांधींच्या प्रभावाखाली आली असताना भारतीय राजकारणात गांधींनी “रामराज्य” संकल्पना आणुन राजकारणात “राम” प्रस्थापित केला. आधुनिक भारताच्या रामराज्य कल्पनेला […]

कसला इतिहास? कसले नायक?

सागर अ. कांबळे भारताचा इतिहास, त्यातही आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं की काय आठवतं? ब्रिटिशांनी भारत कसा काबीज केला… ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरोधात लढा देवून भारताने कसे स्वातंत्र्य मिळवले. लोकस्मृतीमध्ये दोन गोष्टी साठवल्या गेल्या. लोकस्मृतीपेक्षा शिक्षण- सांस्कृतिक धोरणातून राज्याने (सत्ताधारी वर्गाने) लोकांची घडवलेली सार्वजनिक स्मृती असेही म्हणता येईल. त्या दोन गोष्टी […]

राष्ट्रद्रोही कोण?

पवनकुमार शिंदे भारतात अनेक दशके राष्ट्रद्रोही व राष्ट्रभक्तीची चर्चा सुरु आहे. राष्ट्र म्हणजे काय ? राष्ट्र म्हणजे अश्या लोकांचा समूह जो एकजुटिने, सर्वानुमते ठरलेल्या उद्देश्याच्या पूर्ति साठी कार्य करतो. त्या सामूहिक, सार्वजनिक उद्दिष्टांच्या जिंकण्यात सर्वांच जिंकणे असते व त्या उद्दिष्टांच्या हरण्यात सर्वांची हार असते. वेळप्रसंगी त्या उद्देश्याच्या आड येणाऱ्यास शत्रु […]

माणसांचा कोळसा…

प्रकाश रणसिंग महाड मधे उतरल्याबरोबर उन्हाने डोक्यावर थयथयाट मांडला होता. महाड च्या एका कार्यकर्त्याला घेऊन महाड मधील एका कातकरी वस्तीवर भाषेच्या अभ्यासासाठी भेट द्यायची होती. कार्यकर्ता उत्साही होता. त्यानं झपदिशी गाडीची सोय केली. महाडपासून एक तीस-चाळीस किलोमीटर सणाऱ्या गावाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. रस्ता जेमतेम होता. खाण्यासाठी काही फळे सोबत […]