सामाजिक क्रांतीचे प्रणेते : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

नानासाहेब गव्हाणे आंबेडकरांच्या क्रांतिकारी जीवितकार्यात राजकीय कार्याप्रमाणेच अस्पृश्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी जे चिंतन केले व सनदशीर संघर्ष केले, त्यांचे फार मोठे महत्वाचे स्थान आहे.खरे तर डॉ. आंबेडकर हे मूलतः अर्थतज्ज्ञच होते. पण हेही खरे आहे की, बाबासाहेबांचे जीवनकार्य बहुआयामी Multi-dimensional होते. त्यावरुन ‘Genius’ विषयी डॉ. जॉन्सन यांनी केलेल्या विधानाची सत्यता […]

अण्णाभाऊ साठे कथा स्पर्धा – 2021

October 18, 2021 Editorial Team 2

‘अण्णाभाऊ साठे कथा स्पर्धा – 2021’ कथा हा एक लोकप्रिय साहित्यप्रकार आहे. एका छोट्याशा कथेतून लेखक खूप काही सांगत असतो. मराठी साहित्य समृद्ध व्हायचं असेल तर लिहिणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.भीमाच्या लेखण्या (राऊंड टेबल इंडिया) नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अण्णाभाऊ साठे कथा स्पर्धा – 2021’ चे आयोजन करत आहे. तुम्ही […]

निळी पाखरे (धम्मचक्र प्रवर्तन दिन)

अश्वघोष बोधिसागर अंधाऱ्या खोलीत होती पाखरे बंदिस्तसंपूर्ण व्यवस्थेने केली कवाडे बंदया मिट्ट काळोखात येती ना आशेची किरणंअसे अज्ञानतेने केले घात अनंत !! लागता चाहूल प्रखर प्रकाशाचीविरोधकांनी केली दारे घट्ट बंदतरी झगडून आले कवडस्यातूनी आशेची किरणंसर्वास मग उमगले “अरेच्या! हा तर सूर्योदय !!” पाखरांना झाली सत्याची जाणीवउमजू लागली दृष्टी घेऊन उंच […]

संवैधानिक आरक्षणाचा पद्धतशीर बीमोड

प्रवीण उत्तम खरात दहावीचा निकाल जाहीर होतो आणि ११ वीचा प्रवेश सुरु होतो. प्रवेश प्रक्रियेत होणारा जागांचा गोंधळ टाळण्यासाठी तसेच कोविड१९ च्या काळात गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि परीक्षा मंडळ केंद्रीय प्रवेश प्रक्रिया CAP द्वारे ऑनलाईन प्रवेश मिळवण्याची प्रक्रिया सुरू करते ती महाराष्ट्रातील पाच मेट्रो शहरांसाठी असते. विद्यार्थांना रजिस्ट्रेशन , […]

माणूसपण देणाऱ्या धम्माचा स्वीकार ही बाबासाहेबांनी केलेली क्रांतीच

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे प्रत्येक देश हा त्यात राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजांमुळे तयार होत असतो. त्या समाजात असणाऱ्या चालरीतींमुळे त्या देशाची संस्कृती तयार होत असते. आणि कुठलीही संस्कृती तयार व्हायला अनेको वर्षे जावी लागतात. नवी संस्कृती/जीवनपद्धती ही काही आभाळातून पडत नाही. आधीच्याच संस्कृतीतील टाकाऊ व कालबाह्य चालीरीती टाकून देवून, नव्या कालसुसंगत […]

रोमन साम्राज्याच्या इतिहासातून काय शिकवण मिळते?

गौरव सोमवंशी रोमन साम्राज्याच्या इतिहासाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, चांगलं आणि वाईट, दोन्ही. मी फक्त थोडक्यात काही फॅक्ट्स सांगतो, त्यांच्यापासून काय शिकवण घ्यावी ते वाचकाने ठरवावे. रोमन साम्राज्य (अगोदर हेच साम्राज्य हे साम्राज्य नसून एक गणतंत्र होते) हे तसं पाहिलं तर इ.स.पू. 753 पासून ते थेट 1453 AD पर्यंत चालले. […]

द फिलॉसॉफी ऑफ मेरिट

डॉ.भूषण अमोल दरकासे मेरिट, भारतात मेरिट बद्दल होत असणारी चर्चा हि उल्लेखनीय आहे, तिचे जे विविध पैलू आहेत ते समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. मेरिट बद्दल बोलताना तिचे तात्विक स्वरूप सर्वप्रथम जाणून घेणं गरजेचं आहे. मेरिट च्या विविध व्याख्या तपासून पाहिलं तर असं समजून येईल कि त्यात दोन भाग अंतर्भूतआहेत […]

साहेबांचे संघटन कौशल्य: संस्मरण मान्यवर कांशीराम यांच्या जीवनाचे

देवेंद्र बनसोड पशुतुल्य जीवन शूद्रातीशुद्रांच्या वाटेला आला असता, जगण्यासाठी अन्न वस्त्र इत्यादि करिता सवर्णांवर अवलंबून राहणे म्हणजे स्वाभिमानशून्य जीवन जगणे होय, 1845 मध्ये महात्मा जोतिराव फुलेंनी हे ओळखले. अज्ञानता नष्ट करण्याच्या दिशेने फुले नंतर बाबासाहेबांनी जी चळवळ चालविली तीच सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट होय. स्वाभिमान (आत्मसम्मान) हाच ह्या चळवळी चा गाभा […]

लोकशाहीची व्याख्या, प्रतिनिधित्त्व, निवडणूक आणि भारतीय संविधान: एक अभ्यास….

ॲड. शिरीष मिलिंदराव कांबळे लोकशाहीच्या वाटचाल ही फक्त भारतीय संविधान लागू  झाल्यापासून २६.११.१९४९  नव्हे  तर त्यासाठी ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत कसा असावा भारतीय स्वातंत्र्य कायदा १९३५ आणि त्यापूर्वी झालेली १९३०-३२ ची पहिली व दुसरी गोलमेज परिषदेत केलेले ठराव आणि त्यांचे महत्व समजून घेतले पाहिजे.याच गोलमेज परिषदेत मतदार कोण […]

गांधींच्या भूमिकेची आंबेडकरी चिकित्सा!

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे आंबेडकरवादी जेव्हा गांधी किंवा गांधीवादावर टीका करतात, तेव्हा ती टीका व्देषावर आधारित नसते. ती टीका/चिकित्सा असते गांधींच्या भूमिकांची व गांधीवादाच्या व्यवहार्यतेची. गांधींवर सगळ्यात मुख्य आक्षेप आहे पुणे करारात त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर. जर बाबासाहेबांची मागणी मान्य झाली असती तर आज sc समुदायाची राजकीय स्थिती नक्कीच वेगळी असती. […]